महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालयावर आॅल इंडिया पॅथर सेनेचा हल्लाबोल आंदोलन - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Saturday, October 10, 2020

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालयावर आॅल इंडिया पॅथर सेनेचा हल्लाबोल आंदोलन


मुंबई (प्रतिनिधी) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांची थट्टा थांबवून सन २०१९ अंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील ३२०० चालक तथा वाहक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या स्थगितीचा निर्णय तात्काळ रद्द संदर्भात व प्रशिक्षण पुन्हा सुरु करण्यासाठी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय येथे ५ ऑक्टोंबर २०२० रोजी ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले खूप मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी उमेदवार व लिपिक उमेदवार उपस्थित होते  

शासनाच्या निर्णयामुळे शहीद झालेला प्रशिक्षणार्थी विशाल हटवार, अमोल माळी यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची  मदत देण्यात यावी ,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी सरळसेवा भरती सन २०१९ अन्वये जाहिरात क्र. १/२०१९ नुसार एस.टी. महामंडळाने रिक्त असलेल्या जागी चालक तथा वाहक पदाची एकूण ८०२२ पदे भरण्याचा निर्णय घेतला तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदांकरिता प्रशिक्षण घेत आहेत व या चालक तथा वाहक प्रशिक्षणामध्ये धुळे ,नाशिक,औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ, असे एकूण 236 मुलीही प्रशिक्षण घेत होत्या.

परंतु कोरोनाच्या नावाखाली या २०१९ च्या शेतकऱ्यांच्या लेकरांना ४५०० प्रशिक्षणार्थी चालक तथा वाहक कर्मचाऱ्याना घरी बसवले. म.रा.प. महामंडळाच्या हिटलरशाही धोरणाच्या जी.आर. मुळे विशाल हटवार व अमोल माळी यांनी आत्महत्या केली ही आत्महत्या नसून हे म.रा.प. महामंडळाने केलेली हत्या आहे. 

जेंव्हा या निर्णयाविरोधात आंदोलन उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली तेंव्हा पुन्हा या पीडित कर्मचारांच्या हातावर तुरी देण्याचं ढोंग केलं. स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनी ४५०० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची स्थगिती उठवल्याचे वृत्तमान पत्रातून प्रसिद्ध केल. 

जेंव्हा संदर्भ : क्र. राप / कर्मवर्ग / म.ब. / ससेभ / २३७४ दि. ०३.९.२०२० रोजीच्या जी. आरमध्ये फक्त अनुकंपा तत्त्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगिती या पत्राद्वारे उठवण्यात आल्याचे जाहीर केले.

परंतु शेतकऱ्यांचे लेकरं असलेल्या प्रशिक्षणार्थी ३२०० कर्मचारी व यातील २३६ मुली यांची स्थगिती उठवण्यात आलेली नाही. सर्वच स्थगिती उठवल्याचा डंका वाजवला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करताना लाज कशी वाटली नाही? 

ऑल इंडिया पँथर सेना या प्रश्नाला घेऊन गंभीर आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम केलेले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही नौकरी लावतो म्हणून मत मिळवली सत्ता आली, की या लेकरांना हाकलून लावण्याचं काम केलं आहे. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थट्टा आहे. हा प्रश्न अतिशय गंभीर असून ऑल इंडिया पँथर सेना सत्तेसाठी वापर केलेल्या शेतकऱ्यांचा अवमान खपवून घेणार नाही. 

दुसरीकडे मोठ्या थाटामाटात मुलींची भरती करतोय म्हणत, त्यांना विद्यावेतन देण्याची घोषणा मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पत्र देऊन केली होती आजवर त्यांना एक रुपयाही विद्यावेतन दिलं नाही उलट त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम केलं.

शहीद झालेल्या विशाल हाटवार, अमोल माळी यांच्या कुटुंबाचे साधे सांत्वन सुद्धा केले नाही. निर्दयी आणि संवेदनहीन वृत्तीचा आम्ही धिक्कार करतो.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे ३२०० कुटुंब उद्धवस्त झाले आहेत, मानसिक तणावात आहेत, एका पाटोपाट एक आत्महत्या करीत आहेत, ज्यांची लग्न नौकरीच्या नावावर जमली त्यांची लग्न मोडली आहेत. हे कर्मचारी आत्महतेच्या वाटेवर आहेत.

ऑल इंडिया पँथर सेना मागणी करीत आहे की, दिवाळीपर्यंत सर्व रा.प. प्रशिक्षणार्थी चालक तथा वाहक यांची   तात्काळ ३२०० प्रशिक्षणार्थीची स्थगिती स्थगिती उठवून तात्काळ प्रशिक्षण सुरू करावे अशी मागणी निवेदन देतेवेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार व विजय भामरे यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने  यांच्याकडे केली आहे येत्या दिवाळीपर्यंत स्थगिती न उठल्यास व प्रशिक्षण सुरू न झाल्यास आॅल इंडिया पँथर स्टाईलने अचानकपणे एसटी महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे पुन्हा उद्रेकी स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची दखल घ्यावी असे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी एसटी महामंडळाला इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor